​डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे कानून मंत्री असताना (Law Minister) कानून मंत्री पदाचा राजीनामा का दिला?​




डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे कानून मंत्री असताना (Law Minister) कानून मंत्री पदाचा राजीनामा का दिला?
मुख्य 4 कारणे....?
Note:
कृपया नक्की वाचा आणि सर्वां पर्यंत पोहचवा.
"बाबासाहेबांनी घटनेमधे 340 कलम ओ. बी. सी . च्या आरक्षणा विषयी लिहिले त्याची वस्तुस्थिती आणि कर्मकहाणी"​*
(1)​ कलम क्र. 341 नुसार
शेड्युल्ड कास्ट ( SC ) ना 15% प्रतिनिधित्व दिले.
(2)​ कलम क्र. 342 नुसार शेड्युल्ड ट्रायब्जना (ST) 7.5 % प्रतिनिधित्व दिले.
आणि या वर्गवारीतील लोकांचा विचार करण्या अगोदर बाबासाहेबांनी प्रथम OBC म्हणजेच इतर मागासवर्गीय यांचा विचार केला.
म्हणुन बाबासाहेबांनी 340 या कलमानुसार OBC ना प्रथम प्रतिनिधित्व दिले 
(3)​ कलम 340 नुसार OBC ना 52% प्रतिनिधित्व देण्याचे कलम घटनेत टाकले, तेव्हा त्यावेळचे लोहपुरुष सरदार पटेल या कलमाला विरोध करताना म्हणाले हे OBC कोण आहेत?" असा प्रश्न सरदार पटेलांनी स्वत:
OBC असुनहि विचारला.
कारण त्यावेळी SC आणि ST यांची वर्गवारी निश्चित झाली होती आणि OBC नेमके कोण हे ​identified​ झाले नव्हते.
कोणतेही कलम लिहिल्या नंतर बाबासाहेबांना ते कलम प्रथम ​तीन​ लोकांना दाखवावे लागत असे.
1) ​पंडीत नेहरू
2) ​राजेंद्र प्रसाद​ आणि
3) ​सरदार पटेल
हे तिघे 'मंजुर' म्हणाले की बाकीचे त्याला विरोध करण्याचे धाडस करत नव्हते.
त्यावेळी संविधान सभेत एकूण 308 सदस्य होते व त्यापैकी 212 ​Congress​ चे होते .
340 कलम 341 आणि 342 च्या अगोदर आहे हे सर्व OBC बांधवानी लक्षात घेतले पाहिजे.
340 वे कलम हे नेमके काय आहे:
ज्यावेळी बाबासाहेबांनी 340 व्या कलमाचे प्रावधान केले व सरदार पटेलाना दाखवले, त्यावर सरदार पटेल बाबासाहेबांना प्रश्न विचारतात - ​"ये OBC कौन है?"
हम तो SC और ST कोही  ​backward​ मानते है, ये OBC आपने कहा से लाये? सरदार पटेल हे पण बॅरिस्टर होते आणि ते ​स्वत: OBC​ असतानाही त्यांनी या कलमाला विरोध केला.
परंतु या मागील मेंदु मात्र गांधी- नेहरुंचा होता.
यावेळी बाबासाहेब सरदार पटेलांना म्हणाले…
"It's all right Mr. Patel मै आपकी बात संविधान मे डाल देता हू…की संविधानातील 340 कलम हे सरदार पटेलांच्या तोंडचे वाक्य असुन 340 व्या कलमानुसार पटेल यांना OBC कोण आहेत हे माहीत नाही आणि हे ओळखण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा आदेश देत आहे." 
गांधी.. नेहरू.. पटेल.. प्रसाद आणि त्यांची ​Congress​ OBC ओ. बी. सी. ला प्रतीनीधीत्व देऊ ईच्छित नाही हे बाबासाहेबांना दाखवुन द्यायचे होते.
परंतु 340 व्या कलमानुसार  राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी OBC कोण आहेत हे ओळखण्या साठी आयोग नेमला नाही म्हणून दि. 27 सप्टेंबर 1951  बाबासाहेबांनी केंद्रीय  कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
म्हणजे OBC च्या कल्याणासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणारी पहिली आणि शेवटची व्यक्ति म्हणजे बाबासाहेब​.
परंतु अजुनही ही घटना इथल्या OBC ना माहिती नसावी ही खेदाची गोष्ट आहे.
सर्वांत महत्वाचे म्हणजे बाबासाहेबांना तो राजीनामा पंडीत नेहरूनी संसदेत वाचु दिला नाही.
शेवटी 10 OCT. 1951 रोजी बाबासाहेबांनी तो संसदेच्या बाहेर ​प्रसार माध्यमांपुढे​ मांडला.
जर संसदेत राजीनामा वाचला असता तर भविष्यात OBC ना कळले असते की बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी कायदेमंत्रीपदाला लाथ मारली.
बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला ती ​चार​ कारणे अनुक्रमाने खालीलप्रमाणे.
१) ​340 कलमानुसार OBC साठी आयोग नियुक्त केला नाही म्हणून.
२) ​नेहरुंचे परराष्ट्रीय धोरण चुकीचे होते म्हणून
3) ​हिंदु कोड बील मंजूर केले नाही म्हणून
4) ​पंतप्रधानांनी (नेहरूनी) खाते वाटपात बाबासाहेबांबरोबर केलेला दुजाभाव म्हणून
पण बाबासाहेबांनी केवळ  हिंदु कोड बीलासाठी राजीनामा दिला याचा मात्र जाणिवपणे प्रचार केला जातो. 

Comments

Popular Posts