लोकराजा राजर्षि शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

एके दिवशी शाहू महाराज सोनतळी कॅम्प वर एकांतात बसले होते आणि तेवढ्यात त्यांचा हुजऱ्या आला आणि म्हणाला,
" महाराज महाराज"..
शाहू राजे म्हणाले, "काय झाल"
त्यावर त्या हुजऱ्या ने सांगितलं,
"महाराज,कोणा महाराच पोर अमेरिकेहून एम.ए. पी.एच.डी. होवून भारतात आला आहे "
असे ऐकताच शाहू राजे ताडकन उठले आणि म्हणाले,
काय म्हणालास परत बोल एकदा..

 त्यावर त्यो हुजऱ्या म्हणाला,
"महाराज बाबासाहेब नावाचे महार ते अमेरिकेत जावून एम.ए. पी.एच.डी. करून भारतात परत आले आहेत."
आणि शाहू राजांचे डोळे लकाकले त्यांनी आदेश दिला कि,
"जा आणि बाबासाहेब यांचा पत्ता शोधा"
तसे त्यांची लोकं बाबासाहेब यांना शोधण्यासाठी मुंबईत आली. त्यावेळी बाबासाहेब परळ येथे सिमेंटच्या चाळीत राहत होते, पण त्यांना काही बाबासाहेब यांचा पत्ता सापडला नाही.निराश होवून सर्व परत आले आणि म्हणाले,
" महाराज नाही सापडला बाबासाहेबांचा पत्ता."
पण शाहू महाराज यांना काही करमेना,त्यांनी लगेच सांगितले कि,
"बाबासाहेब यांचा पत्ता मी शोधणार."
आणि शाहू महाराज त्या परळ भागातील सिमेंटच्या चाळीजवळ आले. त्यांचा लवाजमा सोबत होताच. लोकांनी ओळखले! कोण त्यांच्या पाया पडत आहे,कोण नमस्कार करीत आहे,आणि त्या लोकांना शाहू महाराज म्हणतात,
"अरे इथे बाबासाहेब आंबेडकर कुठे राहतात"
आणि आश्चर्य वाटल त्या लोकांना अरे कुणब्यांचे राजे कोल्हापूरचे छत्रपती आणि एका महार मुलाचा पत्ता विचारतात ?
परत शाहू महाराज म्हणतात,
"अरे कोणी तरी जावून बाबासाहेबांना सांगा की,कोल्हापूरचे छत्रपती तुम्हाला भेटायला आले आहेत म्हणून."
आणि मग एक लहान मुलगा धावत बाबासाहेबां कडे गेला बाबासाहेबांना सांगू लागला कि,
"कोल्हापूरचे राजे तुम्हाला भेटायला आले आहेत."
आणी आश्चर्य वाटल बाबासाहेबांना!! कोल्हापूरचे राजे आणि माझ्या भेटीला ?
बाबासाहेबांना महित होते कि,शाहू राजाचं कर्तुत्व काय होतं ते,त्यांना माहित होते त्यांचे कार्य आणि बाबासाहेब लुंगी आणि शर्टात खाली आले... पाहतात तर काय साक्षात बहुजनांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज !
आणि बाबासाहेब यांनी शाहू राजांचे पाय धरले...शाहू महाराजांनी त्यांना उतःवळ आपल्या छातीशी लावलं, आलिंगन दिलं, आणि महाराज म्हणाले,
"बाबासाहेब आता माझी भीती कमी झाली.आता बहुजनांना त्यांचा पुढारी भेटला आहे. बाबासाहेब आज तुम्ही धन्य केलात या समाजाला.
आणि बाबासाहेब म्हणाले शाहू राजांना,
"महाराज आपण का तसदी घेतली ? नुसता आदेश दिला असतात तर मी आलो असतो ना कोल्हापुरात...तुम्ही तर राजे आहात महाराज !"
यावर शाहू महाराजांनी काय उत्तर दिल..?
"बाबासाहेब अहो आम्हाला हे राजेपद परंपरेने मिळाल आहे आम्ही परंपरेचे राजे,तुम्ही ज्ञानाचे राजे आहात आणि बाबासाहेब ज्ञानाच्या भेटीला परंपरा आली तर काय बिघडलं?"
☘पुढे या दोघांतील स्नेह उतरोत्तर वाढत गेला.शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं बंद पाडलेलं मूकनायक बोलतं केलं.. माणगांव च्या परिषदेत शाहू महाराज सांगत आहेत जनतेला,
" बहुजनांनो आज तुम्हाला तुमचा पुढारी भेटला आहे."
एवढेच काय! बाबासाहेब ज्यावेळी लंडन ला उच्च शिक्षणासाठी जायला निघाले तेव्हा शाहू राजे बाबासाहेब यांना म्हणतात,
" बाबासाहेब तुम्ही उच्च शिक्षणासाठी बाहेर जात आहात मग मी माझ्या लहान बहिणीला तिच्या माहेरी घेवून जातो.म्हणजे कोल्हापूरला घेवून जातो.म्हणजे तुम्हाला काळजी नसावी.आणि बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले!! ते म्हणतात,
" एक छत्रपती राजा एका महाराच्या माणसाला सांगतो तुझी बायको माझी बहिण म्हणून माझ्या घरी नेवू का ?
 समजेना बाबासाहेबांना अरे हा माणूस आहे कि माणसातला राजमानुसआहे ?
गहिवरून आलं बाबासाहेबांना !
किती जिव्हाळा होता दोघांना एकमेकाबद्दल !
शाहू महाराजांनी तर बाबासाहेबांच्या डोळ्यात बहुजन उद्धाराचे स्वप्न पाहिलं होत.आणि ते बाबासाहेबांनी पूर्ण केल.हे या दोघांचा नातं त्यांच्या अनुयायांना नाही समजल..कधी तरी समजून घ्या शाहू महाराज सुद्धा एक ज्वलंत ज्वालामुखी होते.समाजसेवा हेच त्यांचे ध्येय आणि आयुष्यभर हे दोन महामानव समाजहितासाठी झगडले.
समजून घ्या कधी तरी बाबासाहेब आणि शाहू महाराज.कुठे आहोत आपण त्यांचे अनुयायी काय शिकलो आम्ही त्यांच्या चरित्रातू.....?

Comments