डॉ.बाबा साहेब आंबेडकर


डॉ.बाबा साहेब आंबेडकर
यांनी "१४ ऑक्टोबर १९५६"
रोजी बौद्ध धम्म स्वीकारला.धम्म
स्वीकारताना बाबा साहेब
म्हणाले होते,’मी बौद्ध धम्म स्वीकारला
म्हणून तुम्ही स्वीकारलाच पाहिजे असे नाही.बुद्ध धम्म पचवण्यास
खूप अवघड आहे.यातील नियम खूप कडक आहेत.
जमत असेल तर स्वीकारा. नाही तर लोक
म्हणतील
महारांनी बौद्ध धम्म बाटवला.
बाबा साहेबांनी अगोदरच ओळखले होते.
'आपली भोळी , अडाणी जनता हा धम्म पचवू शकत नाही.'
पण हा विज्ञानवादी धम्मच या पिढ्यान पिढ्या सतावल्या
गेलेल्या जनतेला तारू शकतो.दुसऱ्या धर्मात गेलो तर
आगीतून उठून फुफाट्यात पडल्या सारखे होईल.
खूप विचार करूनच बाबा साहेबांनी हा धम्म
स्वीकारला.
महार समाजाने बौध्द धम्म स्वीकारला असला
तरी हिंदू
मानसिकतेतून ते अजूनही बाहेर पडलेले
नाहीत.बाबा साहेबांच्या
चळवळीत बाबा साहेबां बरोबर ज्यांनी भाग घेतला होता.
ज्यांना बाबा साहेबांवर निष्ठा होती त्यांनी
थोड्याफार प्रमाणात
बौद्ध धम्म सांभाळला.पण नंतरच्या पिढी तर फक्त
बोलूनचालून बौद्ध झाल्या.
हिंदूंचा एकही सन साजरा केल्याशिवाय बौद्द
धर्मीय राहत नाहीत.मग तो दिवाळी असो किंवा
दही हंडी असो.
नवरात्र उत्सवात सर्वात जास्त संखेने शहरात नाचणारे
बौद्धच दिसतात. शिकलेल्या लोकां कडून बौद्ध धम्म
सक्तीने पाळला जाण्याची बाबा
साहेबांची अपेक्षा असेल.
पण त्यांनी तर अधिक जोमाने हिंदू धर्माचेच अवलोकन
केले.
बाबा साहेबांनी म्हंटले होते.मी हिंदू धर्मातील कुठल्याही
देवाला मानणार नाही,’देवाने अवतार घेतले यावर माझा
विश्वास नाही.’पण आमचे शिक्षित लोक देवभोळे झालेले
दिसतील.त्यांचे देव जरा वरच्या दर्जाचे आहेत.
म्हणजे साईबाबा, बालाजी, गजानन महाराज,
साप्त्सृंगी देवी, गणपती………
शिकून आरक्षणावर नोकरी मिळालेले आणि त्यामुळे
मोठे झालेले साहेब लोक या मोठ्या देवांना भाजताना दिसतात.
जरी घरात बाबा साहेब आणि गौतम बुद्धाचा फोटो असेल
तर सोबतीला कुलदैवत ,आणि वर सांगितलेले देवांचे फोटो
असतातच.काही महाभाग तर बाबा साहेबांचा फोटो न
लावता फक्त गौतम बुद्धांची मूर्ती शो पीस म्हणून लावतात.
मोठ्या आदराने गणपती बसवतात.आणि जे
काही
सुख वैभव मिळाले ते गणपती मुळे मिळाले असे वर तोंड
करून सांगतात सुद्धा.साई बाबाच्या कृपेने नोकरीत
बढती मिळाली असे सांगताना त्यांना लाज सुद्धा वाटत नाही.
जर तुमची शैक्षणिक पात्रता नसती तर साई
बाबाने तुम्हाला
बढती मिळवून दिली असती का?
असे विचारले तर तोंड
बंद होते.
हिंदू लोकांनाही लाज वाटेल अश्या जोमाने उत्सव साजरा
करतात. उपास तापासातही हे लोक मागास नाहीत. अगदी निर्जळी उपवास सुद्धा पकडले जातात.बालाजीला
गेले तर केस दिल्या शिवाय येत नाहीत. साई बाबाच्या
दर्शनासाठी वर्षातून एक वारी असतेच असते.
अनेकांच्या घरात देव्हारा असतो.प्रदर्शनी भागात नसेल
तर आतल्या घरात नक्कीच असतो.मोठ्या संखेने लोक
आता हिंदू धर्माकडे आकर्षित होताना दिसत आहेत.
पुढील काही वर्षात बौद्ध धम्म पुन्हा एकदा लयास गेला
तरी नवल वाटावयास नको.
कारण "बौध्द धम्म" महार
समाजाचा म्हणून इतर धर्मीय यात सहजा सहजी येत नाहीत आणि जे बौद्ध आहेत त्यांना हिंदू धर्माचे आकर्षण
सुटत नाही.
इतर धर्मामध्ये जसे घडते तसे बौध्द धम्मात घडत
नाही
बौद्ध धम्माचे पुनरुत्थान करण्यासाठी पुन्हा महामानवाचा
जन्म होनार आहे का?
याचा विचार करावा.
बौद्ध धम्माला बाधक असेल असे कृत्य करू नका.
बाबा साहेबांनी आपल्यावर केलेल्या अफाट
उपकाराची
जाण असु द्या. ​तुम्ही जर आजही देव पूजत असाल तर तुमच्या सारखे दुर्दैवी तुम्हीच.
जय✺भीम....नमो✺बुद्धाय
    

Comments

Popular Posts